दमा (श्वास रोग )

दमा

दमा सर्वांनाच होऊ शकतो परंतु त्याची सुरुवात लहानपणी होते. पुन्हा पुन्हा श्वास अडकणे किंवा सतत दम लागणे अशा प्रकारच्या लक्षणातून प्रकटणार्‍या या रोगाच्या त्रासाची वारंवारता व तीव्रता व्यक्तीवर अवलंबून असते. श्वसनमार्गाचा दाह झाल्यामुळे श्वसनमार्गातील चेतातंतूचे अधिक ज्वलन होते. म्हणून या प्रकारच्या दमाच्या त्रासादरम्यान श्वसनमार्गाच्या आतील त्वचा सुजल्यामुळे फुप्फुसात जाणार्‍या हवेचा प्रवाह कमी होतो.

दम्याची कारण :-
१) अनुवंशिकता, २) हवेचे प्रदूषण (धूळ, तंबाखू/ सिगारेटचा धूर, जळत्या लाकडांचा धूर, पेट्रोल/ डिझेलचा धूर, कारखान्यांचा धूर.) ३) कीटकनाशके, सेंट अथवा सुगंधी द्रव्यांचा वास, ४) केसाळ अथवा पिसे असणाऱ्या पाळीव प्राणी, पक्ष्यांचा सहवास, ५) सतत थंड व कोरड्या हवेत राहणे, ६) घरात अथवा आजूबाजूला दमटपणा व ओलसरपणा सतत असणे, ७) एखाद्या अन्नपदार्थाची (गहू, अंडे इ.) किंवा डबाबंद पदार्थात घातलेल्या एखाद्या घटकाची ऍलर्जी. ८) एखाद्या औषधाची ऍलर्जी, ९) सतत सर्दी, पडसे, सायनसचा त्रास असणे, १०) कारखान्यातील रासायनिक पदार्थांचा वास, कापसाचे कण, ११) फुलांचा वास अथवा परागकणांची ऍलर्जी, १२) सतत अपचनचा त्रास असणे, १३) अतिशय शारीरिक श्रम, १४) अत्याधिक मानसिक ताणतणाव, अस्वस्थता, दडपशाहीमुळे भावनांचा कोंडमारा होणे, १५) शरीराची प्रतिकारशक्ती एकंदरीत कमी असणे.
अर्थात वरीलपैकी कोणतेही कारण नसल्यामुळेसुद्धा दमा होऊ शकतो, तर वर सांगितलेल्या कोणत्याही कारणांमुळे शरीराची प्रतिक्रिया होते (श्‍वसनमार्ग आकुंचन पावणे) म्हणून दम्याला ठशरलींर्ळींश अळीुरू ऊळीशरीश असेही म्हटले जाते. म्हणून रुग्णाने थोडी जागरूकता ठेवून दम्याच्या लक्षणांपूर्वीचे कारण ओळखून त्या गोष्टीचा संपर्क टाळावा.

दम्याची लक्षणे :-
१) श्‍वास घ्यायला अतिशय त्रास, धाप लागणे,
२) सर्दी, खोकला,
३) छातीत जडपणा जाणवणे,
४) छातीतून आवाज येणे (थहशशूळपस),
५) बोलण्यास त्रास होणे,
६) रुग्णास अशक्तपणा, बेचैनी जाणवून तो घाबराघुबरा होतो.
७) झोपल्यावर त्रास वाढतो, तर बसल्यावर कमी होतो.
८) कधी कधी सारख्या दम्यामुळे रुग्ण चिडचिडा होतो.
९) चेहरा लाल होणे, मानेचे स्नायू ताठरणे, जीभ व नखे निळसर दिसणे ही घातक लक्षणे होत.
दम्याचा ऍटॅक काही मिनिटांपासून काही तास ते काही दिवसांपर्यंत राहू शकतो. आहार, विहार, आजूबाजूच्या वातावरणाची काळजी व प्रतिबंधात्मक उपाय केले, तर दमा त्रासदायक ठरत नाही. मात्र ऍटॅक आल्यावर तातडीचे उपचार घेणेच योग्य ठरते. निसर्गोपचार व ऍक्‍युपंक्‍चरमुळे दम्याचा त्रास (ऍटॅक कमी होणे, सर्दी कमी प्रमाणात बाहेर पडणे, हुशारी वाटणे) निश्‍चितपणे कमी होऊ शकतो.

कोणती काळजी घ्यावी? :-
१) सर्वप्रथम अतिशय सकस व पूरक आहार घ्यावा. जेणेकरून जीवनसत्त्वे व पूर्ण प्रथिनांची कमतरता भरून निघेल व शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.
२) पोषक आहार एकाच वेळी पोट जड होईपर्यंत न घेता थोड्या थोड्या प्रमाणात दिवसातून ४-५ वेळा घेणे. ८-१२-४-८ वाजता अशा दिवसाच्या आहाराचा आदर्श वेळ ठरतील. (आपल्या दिनक्रमानुसार यात थोडा बदल चालेल, मात्र रात्रीचे जेवण ८-८।। पर्यंत घ्यावेच.)
३) तळलेले पदार्थ व थंड पदार्थ, पाणी टाळावे. उलट कोमट पाणी दिवसभर घेतल्यास रुग्णास फायदाच होईल.
४) कोमट दुधामध्ये मध (१ चमचा चहाचा) घालून घ्यावे.
५) ७-८ तुळशीची पाने १/२ ग्लास पाण्यात घालून उकळावे. कोमट झाल्यावर प्यावे.
६) अनुलोम – विलोम, भस्त्रिका प्राणायाम योग्य पद्धतीने हळूहळू करत ५ मिनिटांपर्यंत नियमित रोज केले तरी खूप फायदा होतो. उजव्या नाकपुडीतून हवा घेऊन डाव्या नाकपुडीने हवा सोडणे असे १-१० अंक मोजेपर्यंत करावे.
७) सिद्धासन, भुजंगासन, सुप्त वज्रासन, मत्स्यासन, शवासन इ. आसने आधी नीट शिकून घेऊन करावीत. शिवमुद्राही १० मिनिटांपर्यंत करावी.
८) काही ऍक्‍युप्रेशर बिंदूंनाही दाब देऊन फायदा होतो.
९) ज्यांना शक्‍य असेल त्यांनी सकाळचे ऊन छातीवर व पाठीवर घ्यावे. (कडक ऊन नको) किंवा सोसवेल एवढ्या गरम कपड्याने छाती व पाठीकडची बाजू शेकावी.
१०) गरम पाण्याचा वाफारा नियमित घेणे व गरम पाण्याच्या गुळण्या करणे यामुळे सुद्धा रुग्णांना खूप आराम मिळतो.
११) आंघोळीच्या वेळी गरम पाण्याची (सोसवेल एवढेच) धार छातीवर व पाठीवर धरावी.
१२) सोन्याचा व चांदीचा छोटासा पत्रा अथवा तुकडा घालून उकळलेले पाणी रुग्णास प्यायला द्यावे.
१३) रुग्णाने मोकळ्या हवेत फिरून येणारी तरतरी अनुभवावी.
१४) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचार करून ताणतणावांपासून दूर राहावे. मनातील भावनांचा व मतांचा निचरा वेळोवेळी योग्य पद्धतीने करावा.
१५) दिवसातील ५ मिनिटे तरी भगवंताचे नामस्मरण जरूर करावे.
१६) ज्या रुग्णांना तपकीर ओढण्याची, तंबाखू, पानमसाला खाण्याची व विडी/ सिगरेट ओढण्याची सवय असेल त्यांनी या गोष्टींपासून दूर राहावे.
१७) आहारात लसूण, पडवळ, दुधी भोपळा, चवळई इ. भाज्यांचा समावेश करावा.

काही घरगुती उपाय :-

१)समुद्री कासवाचे  तेल ५ थेंब घेऊन सकाळी पाण्याबरोबर ३ दिवस घेतल्याने या रोगात आराम येतो .

२)एक चांगले केळे घेऊन त्याचे साल न काढता त्यात भोक करावे .त्या भोकात थोडेसे सेंधा मीठ आणि काळी मिरीचे चूर्ण भरून चांदण्या रात्रीत रात्रभर ठेवावे.सकाळी त्याला आगीत शेकून खावे. शरद (कोजागिरी ) पौर्णिमेच्या रात्री ठेवलेले केळे दुसऱ्या दिवशी खाल्याने विशेष फायदा होतो.

३)अखंड इसबगोल घ्यावा . त्यात सत किंवा भुसा नको . याला साफ करून सकाळ संध्याकाळ १० -१० ग्राम इसबगोल पाण्याबरोबर गिळावे . एका महिन्यात आराम येतो . पश्चात तांदूळ , तळण , तेल, आंबट, वातूळ, पदार्थ घेऊ नये . बरे झाल्या नंतर ही सहा महिने पथ्य पाळावे .

Leave a Reply